Wednesday, 26 August 2009

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना तुरुंगावासात डांबून ठेवण्यासाठी त्यांना घेऊन लंडनवरून निघालेले एस्.एस्. मोरिया हे ब्रिटीश जहाज ७ जुलै १९१० रोजी फ्रान्सच्या मार्सेलीस बंदरात नांगरण्यात आले होते. वीर सावरकर यांनी या वेळी स्वत:ची सुटका करून घेण्याचे नक्की केले. या धाडसी प्रयत्‍नाचा जगभर चांगला परिणाम होईल व पूर्ण जग ब्रिटनच्या विरोधात होईल, असे सावरकर यांना वाटत होते. तुरुंगात कोंडून मरण्यापेक्षा धाडसी मरण पत्करणे चांगले. त्यातून जगाचे लक्ष भारताकडे वेधले जाईल, असा विचार करून ८ जुलै १९१० रोजी रोजी इंग्रजांच्या तावडीतून सुटका करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. संडासातील खिडकीतून त्यांनी पाण्यात उडी टाकली. त्यानंतर पोहून त्यांनी किनारा गाठला व सुटकेसाठी धूम ठोकली. त्यांना फ्रेंच पोलिसांनी अटक केली. त्यांचा सुटका करून घेण्याचा प्रयत्‍न फसला; मात्र त्यांचा हेतू साध्य झाला. जगभर ब्रिटनचे हसे झाले व प्रत्येक जण ब्रिटन सरकारला दोष देऊ लागले. सावरकरांच्या या धाडसी युक्‍तीने ब्रिटीश सरकारला पुढील दोन महिने नुसते हादरवून सोडले होते.गाजलेल्या या समुद्र उडिच्या शतक पुर्ती दिना निमित्त सावरकरांना शतशा प्रणाम....!!

No comments: